Monday, March 19, 2007


सापांचा डसाण्याचा गुणधर्म
माणसांच्या अंगी भिनलाय
ज्यांनी संकटात साथ दिली
त्यालाच तो डसलाय
- महेश जाधव

मनापासून मनापर्यंत
पुल मला बांधायचाय
एक मन आहे माझ्या जवळ
दुसरे मला शोधायचंय
- महेश जाधव

मानसाला मेल्यावरती
नवा जन्म मिळतो म्हणतात
पण इथे मेल्यावर ही जिवंत आहेत
त्या मुडद्यांचे काय?
- महेश जाधव

कुणासाठी अश्रु गाळावे?
हाच प्रश्न उरलाय
पण अश्रु गाळुन तरी
कुणाचा प्रश्न सुटलाय?
- महेश जाधव

चालता चालता ठेच लागली
तर त्या दगडाला दोष देवु नका
तो तर शेवटी दगडच,
तुम्ही डोळे बंद करुन चालु नका.
- महेश जाधव

सागरातील कित्येक लाटा
अर्ध्यावरच अस्तित्व गमवतात
पण ज्या काही किनार्यापर्यंत पोहचतात
त्याही पुन्हा सागरातच मिसळतात
- महेश जाधव


No comments: